Category: Articals

  • मेंदूत कोरल्या गेलेल्या आठवणींचे भग्नावशेष…!

    घडून गेलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मेंदूवर कोरल्या जातात असं अजिबात नसतं. मात्र काही ठळक गोष्टी कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. हा जीर्ण अन कोणत्याही क्षणी कोसळण्याची वाट पहात असलेला बंगला….हा मेंदूत घर करून बसलाय. अर्धवट किलकिले पण सताड उघडे दरवाजे, काही तावदाने निखळून पडलेल्या खिडक्या, भिंतींचा रंग पार उडालाय. स्वतःहून कोसळणाऱ्या मलब्याला स्वतःच्याच ओंजळीत घेवून…

  • विवाह नोंदणी संस्थांकडे केल्या जाणाऱ्या अपेक्षा चक्रावणाऱ्या

    माझ्यासारखे वृत्तपत्रात काम करणारे बरेच जण रोज वृत्तपत्र बारकाईने वाचण्याची अजिबात तसदी घेत नाहीत. विशेषतः स्वतः लिहिलेल्या बातम्या किंवा स्फुटलेखन, आर्टिकल अगदी एखाद्या जाहिरातीला ‘टॅग लाईन’ सुचविली असेल तर ती देखील व्यवस्थित आली की नाही ? हे चाळणे म्हणजे वृत्तपत्र वाचणे असा एक समज करून घेतला आहे. त्यातही आपण लिहिलेल्या मजकुरात काही भयंकर चूक आढळल्यास…

  • मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा

    ब्रिटिशांच्या जोखडात संपूर्ण देश असताना ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा ध्वज’ फडकवत साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापूर शहरावर ब्रिटिशांनी ‘मार्शल लॉ’ सारखा जुलमी कायदा लागू केला. मुळातच भारतावर राजवट करणाऱ्या ब्रिटिशांनी मार्शल लॉ या जुलमी कायद्याची निर्मिती केल्यानंतर राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी या कायद्याचा वापर अखंड भारतात फक्त दोन शहरांवर केला होता. सोलापूर आणि पेशावर (फाळणी…

  • शाहरुखचा ‘पठाण’ अन संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे’…!

    बऱ्याच वर्षानंतर हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा एकतर बिग बजेट असून बऱ्याच गॅप नंतर एका सुपर-डुपर हिटसाठी आसुसलेल्या शाहरुखचा सिनेमा असल्याने हा सिनेमा चालला तरच बॉलीवूड तरणार अन्यथा बॉलीवूडचे अस्तित्व धोक्यात येईल असं मानणारे चित्रपट उद्योगातील अनेक अभ्यासक, कलावंत आणि किंग खानला आपला हिरो मानणाऱ्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे तद्दन मसाला चित्रपट…

  • जन्मस्थळाचे महात्म्य मोठे की समाधीस्थळाचे….?

    अगदी हे आर्टिकल लिहायला बसलो तेंव्हा माझ्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माचे, पंथाचे, विचारांचे संत-महात्मे किंवा राष्ट्रपुरुष असू द्यात. त्यांचा अनुनय करताना आपल्याला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत त्यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी असतो. मग या अवतारी पुरुषांच्या जन्मस्थळापेक्षा त्यांच्या समाधीस्थळाचे महात्म्य मोठे का असते ? अतिशय जिज्ञासेपोटीच मी ही शंका…

  • देशाला लागणाऱ्या साखर उत्पादनापैकी सातवा हिस्सा सोलापूरचा

    कायम अवर्षणप्रवण राहिलेला सोलापूर जिल्हा १९६० नंतर मात्र पारंपारिक शेती न करता नगदी पिकाकडे वळला. त्यातूनच साखर कारखानदारी उभी राहिल्यावर कारखान्याच्या पाठबळावर परिसरातील शेतकरी ऊस लागवड करू लागला. ६० च्या दशकात जिल्ह्यात दोन-तीन साखर कारखान्याच्या उभारणीने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. आज साठ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील सहकारी कारखाने आणि खासगी कारखान्यांची संख्या चाळीशी पार गेली आहे.…

  • हॉटेल्सच्या संख्येत होणारी वाढ व्यवसायाला कितपत फायदेशीर…?

    अठराव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती मधून क्लबच्या माध्यमातून सुरू केलेली हॉटेल्स हीच भारतीय हॉटेल इंडस्ट्रीची सुरुवात समजली जाते. त्या अगोदर भारतात मंदिर, मठ, धर्मशाळा, राजा अथवा अमीर-उमराव यांच्या मदतीने चालविली जाणारी अन्नछत्र ही पर्यटक, प्रवासी, अनाहूत, अशांची दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था लावत होती. भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे मानल्या जात असल्याने अन्नदान हा एक संस्कार…

  • नकली दागिन्यांनी प्रत्यक्ष देवाची बोळवण……!

    विठुराया भक्तीचा भुकेला अठ्ठावीस युगांपासून आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कर कटीवर ठेवून विटेवर उभारलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला देखील नवस पूर्ण करण्यासाठी बनावट दागिने अर्पण करणारे भक्त भेटतात. भक्तांच्या फक्त भक्तीचा भुकेला असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचे हे शल्य प्रत्यक्ष पांडुरंगच समजू जाणे….’ एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की भी नही सूनता ‘ हा आदर्श बाळगणाऱ्या…

  • नरेंद्र मोदींना धूर्त म्हणायचं की दृढनिश्चयी समजायचं…?

    थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांचे देशाप्रती व्यक्त झालेल्या अनेक सुंदर सुभाषितांपैकी एक कोट अलीकडे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असते. “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो अन या देशाचे आपण देणे लागतो” स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हिंदुत्वविरोधी विचारधारा अंगिकारणाऱ्या अनुयायांमध्ये अनेक प्रवाद आहेत. अगदी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शिंतोडे उडविण्यापर्यंत या वाचाळवीरांची मजल जात असते. अलीकडे भारतीय…

  • दिव्यमराठीचे फूड फेस्टिव्हल अन सोलापुरी खवय्येगिरी

    प्रत्येक शहराची-गावाची ओळख ही तिथल्या ऐतिहासिक-सांस्कृतिक परंपरा बरोबरच तिथल्या खाद्य संस्कृतीमुळे लक्षात राहणारी असते. एखाद्या गावाला किंवा शहराला यापैकी कुठलाच वारसा नाही असे गाव किंवा शहर या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. भाषा-धर्म-प्रांत हे भलेही माणसा-माणसांमध्ये दुफळीचे निमित्त ठरत असतील. मात्र तिथली खाद्य संस्कृती ही माणसा-माणसांमध्ये एकोपा निर्माण करणारी असते. बहुविध भाषा आणि एकापेक्षा जास्त धर्म…